जिंकून आलो की, ‘पार्टी’ करू या; उद्धव ठाकरे
मुंबई :- मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने आमदारांची बैठक घेऊन शक्तीप्रदर्शन केले. यावेळी आमदारांना एकतेच आवाहन करत आघाडीचे चारही उमेदवार १०० टक्के विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सोबतच जिंकून आल्यावर जंगी पार्टी करू असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या या बैठकीला शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे व उद्धव ठाकरे तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांसह १२ अपक्ष आमदारही उपस्थित होते.
*आपण पार्टी करु…*
“राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला विजय होणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सर्वांनी एकत्र रहायचे आहे. आपले संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे दोन्ही निवडणुका झाल्यावर आपण पार्टी करु. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा भाजपने मोडली”
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे