बार्टी समतादूत मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणा येथे वृक्षारोपण
सतीश भालेराव, नागपूर
हिंगणा:- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समतादूत प्रकल्प नागपूर विभाग तालुका हिंगण्याच्या वतीने ओद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणा येथे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण पंधारवाडा कार्यक्रमाच्या अंतर्गत हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर व अमोल खवसे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले.
ओद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगण्याच्या प्राचार्या अर्चना चवाळे यांच्या हस्ते, यावेळी क्रीडा मार्गदर्शक सतीश भालेराव, सेवानिवृत्त वरिष्ठ शिक्षक विनायक इंगळे गुरुजी, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. समतादूत सतीश सोमकुंवर यांनी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करण्याची प्रतिज्ञा वृक्ष मित्रांना दिली. आणि प्रबोधनात सांगितले की व्यक्तीच्या जीवनात वृक्षाचे अन्य साधारण महत्त्व लक्षात घेता वृक्ष आमचा श्वास आहे,
वृक्ष आमचा ध्यास आहे. वृक्ष आमचा जीवन दाता आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” म्हणून वृक्षारोपण करुण पर्यावरणाचे संवर्धन करावे. “वृक्ष जगले तर मानव जगेल,” असा मौलिक संदेश समतादूत सोमकुंवर यांनी दिला. ओद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगण्याच्या प्राचार्य अर्चना चवाळे यांनी सांगितले की, वृक्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे, म्हणून व्यक्तीने वृक्षतोड थांबवून प्रत्येकाने एक वृक्ष लावून निसर्गाचे संवर्धन करावे. असे प्रतिपादन केले. वृक्षारोपण प्रसंगी आय.टी.आय.चे फॅशन डिझायनिंगचे प्रमुख वर्षा मेश्राम, अरविंद गणवीर, अनिल तिजारे, सिमा पुंड आय.टी.आय. कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमच्या यशाकरिता बार्टी महासंचालक, समतादूत विभाग प्रमुख व जिल्हा प्रकल्प अधिकारी यांचे मागदर्शन मिळाले. एक विद्यार्थी एक वृक्ष जगवन्याचा संकल्प करण्यात आला.