पावसाळ्यात आजार वाढण्यापूर्वी न .प. वाडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात
_न.प वाडी चे उपमुख्यधिकारी यांना मनसे वाडीने दिले निवेदन_
प्रमोद गाडगे, नागपूर
नागपूर: पावसाळा सुरू होऊन पंधरवाडा उलटला आहे. मान्सून सुरू झाला आहे. पावसामुळे साथीच्या आजारांची संख्या पावसाळ्यातच वाढण्याची दाट शक्यता असते. त्यातच लहान मुलांचे आरोग्य पावसाळ्यात बिघडण्याची शक्यता असते. यावर नगरपरिषद वाड ने वेळीच उपाययोजना कराव्यात यासाठी मनसे वाडीने नप वाडी उपमुख्यधिकारी रत्नमाला फटींग यांना आज दि २८ जून रोजी निवेदन सादर केले आहे.
पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होते, तसेच यापासून साथीचे आजारही वाढू शकतात. विशेषतः पावसाळ्यात टायफॉईड, मलेरिया, कॉलरा, चिकून गुणिया हे साथीचे आजार पावसाळ्यात पसरण्याची भीती असते. त्यामुळे असे आजार जनतेच्या घरापर्यंत पोहचू नयेत, यासाठी दक्षता घेणे आवश्यक असते. अनेक आजार हे पाण्यामुळेच होत असतात.
पावसाळ्यात या मोसमात अतिसार, जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो आणि सीझनल फ्ल्यू म्हणजे एनफ्लुएन्झा यांचा प्रादुर्भाव नेहमीच असतो. तसेच मलेरीया चिकन गुणीया, डेंग्यू, हिवताप हे आजार मच्छरने होतात पावसाच्या दिवसात आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी नगरपरिषद ने परिसराची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
घाण, कचरा, चिखल व पाणी तुंबून ठेवणारी गटारे यामुळे अशा जीवघेण्या आजारांची लागण होत असते. मागच्या वर्षी डेंग्यू च्या आजाराने मृत्यू झाला आहे आपल्या घराजवळील परिसरात जीवघेण्या जंतूंची, डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वाडीत राबविण्यासाठी कोणतेही कसर सोडू नये , जीवितहानी होणार याची सर्वस्व जबाबदारी नगरपरिषद वाडी प्रशासनाची आहे.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस मा हेमंत भाऊ गडकरी जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थीत तालुका संघटक दीपक ठाकरे, तालुका अध्यक्ष अनिल पारखी,वाडी शहर उपाध्यक्ष वैभव तुपकर, संदीप माने, ओंकार तलमले, अश्विन कोडापे विक्की वानखेडे, संतोष पाल, मुकेश मुंडले, अजिंक्य वाघमारे, विठोबा घुरडे, सूरज भलावी,नितीन पिठोरे, बबलू सिंघ, वेदांत राहंगडाले,आकाश बाबर,दिलीप टापरे, संदीप भणगे, राजेंद्र करणाके, देवेंद्र सोंनकुसरे,स्वप्नील शेडामे ,संजय गायकवाड,आकाश मिसाळ उपस्थित होते.