समायोजन
संसाराचे दळण दळताना
मनातले दुःख विसरते…
आनंदाचा ठेवा पदरी बांधून
एक एक दिवस मोलाचा जगते
कधी नात्यात बहरताना फुलले
हसता हसता नयनी अश्रू दाटले
जवळचे नसे कुणी आपुले…
आता दुःख मनाला उमजले
कधी स्वार व्हायचे दुःखावर
कधी भावना होई अनावर..
कस्तुरीचा गंध स्वतः जवळ
नको कुणाचा कधी उपकार
रस्ता थोडा आहे खडतर
आत्मविश्वासाचे पाऊल टाकून
रात चांदणी प्रकाश दाखवते..
दुःखाचे अश्रू दिले सोडून
प्रयत्नांती स्वप्न उत्कर्षाचे
स्वतः ला बळकट केले..
समायोजन हेच जीवन सार
अंधारातही ज्योतीने दर्शन दिले
सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे
======