पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेकडून केंद्रप्रमुख नवनाथ जाधव यांचा सत्कार
पालघर: समाजातील प्रत्येक घटका पर्यत पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या पर्यंत वृक्षारोपण व वृक्षारोपण संगोपन यासाठी जनजागृती करणारे समाज सेवक व नोकरदार यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त , जिल्हास्तरीय पर्यावरण जनजागृती स्पर्धा आयोजित करणे, शाळेतील विद्यार्थी स्वावलंबी होण्यासाठी वाडा तालुक्यातील विद्यार्थांना NGO शांती मंदिर ट्रस्ट व प्रोजेक्ट मॅनेजर सौ प्रमिला पाटील यांची मदत घेऊन 20000 फळ झाडे पोहच करून प्रत्यक्ष विद्यार्थी व पालक व महिला बचत गट यांच्या मधे जागृती निर्माण करून आपल्या परिसरात व शेतात फळ झाडे लावून घेण्याचे भरीव कार्य केल्याबद्दल त्यांच्या पर्यावरण विषयक कार्याची दखल घेवून पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशिय संस्था भारत या संस्थेमार्फत श्री नवनाथ हरी जाधव केंद्रप्रमुख तथा कास्ट्राईब संघटना जिल्हा अध्यक्ष पालघर यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले.
उत्कृष्ठ कार्याबद्दल पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था भारत यांनी सभासद करून घेतले , या सत्काराबद्दल कस्ट्राइब शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष विजयकुमार जाधव व सर्व सभासद मित्रा मार्फत शाल व बुके देवून नवनाथ जाधव सर यांचे अभिनंदन करण्यात आले.