लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
नागपूर: “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ” अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वतंत्र आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ओळखले जातात. बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतिकारी, पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील व भारतीय स्वतंत्र सेनानी होते. भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश अधिकारी त्यांना “भारतीय अशांततेचे जनक ” म्हणत होते. म्हणूनच लोकमान्य ही पदवी देण्यात आली.
टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीत एका ब्राह्मण कुटुंबात चिखली येथे झाला. 1 ऑगस्ट 1920 रोजी, लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. आज आपण त्यांची सर्वत्र पुण्यतिथी साजरी करतोय. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे काही अनमोल विचार तुमच्या जीवनाला योग्य दिशा नक्की देतील. जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते. असे टिळकांनी म्हटले आहे.