शिवसेनेचा सावध पवित्रा : आमदारांना सुरक्षितस्थळी पाठविले
मुंबई :- महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चांगली चुरस पाहायला मिळत आहे. राज्यसभेसाठी १० जूनला निवडणूक होत असून, निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना सुरक्षितस्थळी पाठवले ज
आहे.
यासाठी सर्व आमदारांना सोमवारी (ता. ६) वर्षा बंगल्यावर बोलावल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून सहा जण राज्यसभेवर जाणार आहेत. यामुळे येथे चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी मोठी स्पर्धा होत आहे. सर्वच पक्ष आपलाच उमेदवार जिंकणार असल्याची भाषा करीत आहे. यात शिवसेना व भाजप आघाडीवर आहे. भाजपने उमेदवार दिल्याने चुरस पाहायला मिळणार आहे. मत फुटू नये म्हणून शिवसेनेने सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
*सोमवारी सायंकाळी ‘वर्षा’वर बैठक*
सोमवारी सायंकाळी सहा वाजता अपक्ष आमदारांची वर्षावर बैठक होणार आहे. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेने सर्वच आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावले आहे. या बैठकीनंतर शिवसेनेचे व अपक्ष आमदारांना सुरक्षितस्थळी पाठवले जाणार आहे.