राज्यकर्त्यांना, ओबीसी समाजाने हक्काची विचारणा करावी; डॉ बबनराव तायवाडे

राज्यकर्त्यांना, ओबीसी समाजाने हक्काची विचारणा करावी; डॉ बबनराव तायवाडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, प्रतिनिधी

चंद्रपूर: विदर्भातील चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे, दिल्ली येथे ७ आगस्ट २२ला होणाऱ्या महाअधिवेशनाच्या तयारी निमित्ताने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी विदर्भातून उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ओबीसी समाजाने आपल्या हक्कासाठी राज्यकर्त्यांनां संघटीत शक्तीचे दर्शन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडीयम ये होणा-या अधिवेशनासाठी विदर्भातील जिल्ह्यातून सर्व अध्यक्ष पदाधिकारी मिळून पाच हजार ओबीसीचे मस्तक दिल्ली अधिवेशनासाठी तयार झाले पाहिजे असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनां केले.

याप्रसंगी सभेची प्रस्तावना महासचिव सचीन राजुरकर यांनी केली. राष्ट्रीय समन्वयक डॉ अशोक जिवतोडे यांनी ओबीसी च्या एकंदरीत अडचणींवर भाष्य करुन संघटीत शक्ती हेच आपले शक्ती स्थळ आहे या कडे लक्ष वेधले. या सहविचार सभेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, राष्ट्रीय सहसचीव शरद वानखेडे, महिला अध्यक्ष सुषमा भड, कार्यकारीणी सदस्य डॉ रेखाताई बारहाते, ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शामभाऊ लेंडे, विदर्भ अध्यक्ष प्रदीप वादाफळे यांनी मार्गदर्शन केले, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, इत्यादी ठिकाणाहून दिल्लीसाठी येणाऱ्यांनी आपले आकडेवारी दिली.

या अधिवेशनासाठी देशभरातील ओबीसी हक्कासाठी कार्य करणाऱ्या सर्व प्रमुख नेते, राजकीय पक्ष प्रमुख, खासदार,अभ्यासक यांना आमंत्रित केले असल्याचे वानखेडे यांनी सांगितले,या महाअधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागिल ६ वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा विशेषांक काढण्यात येणार आहे, लेखकांनी रा.ओबी महासंघाच्या अनुभवाचे लेखन, शासनाकडून मंजूर झालेल्या मागण्या चे लेखन, तसेच ओबीसी काल आज आणि उद्या या विषयांवर लेख पाठवावे असे राजुरकर यांनी सांगितले.

या सहविचार सभेला राज्याचे महासचिव राजेश काकडे, विदर्भाचे कार्याध्यक्ष शकील पटेल, नागपूर शहर उपाध्यक्ष परमेश्वर राऊत, यवतमाळ चे जिल्ह्याध्यक्ष रमेश ठाकरे,प्रा फेंडर, चंद्रपूर अध्यक्ष प्रा कुकडे या,शिवाय , गोंडपिपरी, चिमुर ,मुलं, या ठीकाणाहुन बहुसंख्य पदाधिकारी आले होते. कार्यक्रमाचे आभार कर्मचारी अधिकारी महासंघाच्या पदाधिकारी रजनी मोरे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles