वृक्ष लावून वसुंदरेचे संवर्धन करा; सतीश सोमकुंवर
नंददत डेकाटे, नागपूर
हिंगणा: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समतादूत प्रकल्प नागपूर विभाग हिंगणा तालुक्याच्या वतीने अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींची शासकीय निवाशी शाळा वानाडोंगरी येथे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण पंधारवाड़ा कार्यक्रमाच्या अंतर्गत हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले.
अनु. जाती नवबौद्ध मुलींची शासकीय निवाशी शाळेच्या मुख्यधापिका दुषिला मेश्राम यांच्या हस्ते व सेवानिवृत्त शिक्षक विनायक इंगळे गुरुजी, समतादूत अमोल खवसे, सामाजिक कार्यकर्ते सतीश भालेराव, यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी समतादूत सतीश सोमकुंवर यांनी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करण्याची प्रतिदन्या विद्यार्थी वृक्षमित्रांना दिली. आणि प्रबोधनात सांगितले की व्यक्तीच्या जीवनात वृक्षाचे अन्यय साधारण महत्त्व लक्षात घेता वृक्ष आमचा श्वाश आहे, वृक्ष आमचा ध्यास आहे. वृक्ष आमचा जीवन दाता आहे. तुकाराम महाराज सांगतात की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” म्हणून प्रत्येक व्यक्तीने “वृक्षारोपण करुन वसुंदरेचे व पर्यावरणाचे संवर्धन करावे”. असा मौलिक संदेश समतादूत सोमकुंवर यांनी दिला.
सेवानिवृत्त शिक्षक विनायक इंगळे, यांनी सांगितले की, वृक्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे म्हणून व्यक्तीने वृक्षतोड थांबवून प्रत्येकाने एक वृक्ष लावावे व वृक्ष जगेल तर मानव जगेल असे प्रतिपादन केले. मुख्यधापिका दुषिला मेश्राम यांनी सांगितले की, एक विद्यार्थी एक वृक्ष जगवन्याचा संकल्प आमच्या शाळेनी केला आहे. त्यासाठी विद्यार्थी वृक्षमित्रांची निवड करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी सहाय्यक शिक्षक पंकज लेदाडे, सहाय्यक शिक्षिका प्रियंका डांगेवार, रंजना गजाम, प्रयोगशाळा परिचर स्वाती गादे, समतादूत सतीश सोमकुंवर, अमोल खवसे, ग्रंथपाल रेखा राठोड, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमच्या यशाकरिता बार्टी महासंचालक धम्मज्योति गजभिये , समतादूत विभाग प्रमुख उमेश सोनवणे व जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांचे मागदर्शन मिळाले समतादूत सतीश सोमकुंवर यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वी झाला.