केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जा बुधवार दि ६ जुलै रोजी आपल्या अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेची त्यांची मुदत संपल्यानं कॅबिनेट बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत नक्वी यांच्या कार्याचा गौरवही केला. तसेच याशिवाय केंद्रीय पोलाद मंत्री आरसीपी सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाळही गुरूवारी संपणार आहे.
राज्यसभेतील भाजपच्या दोन खासदारांचा उद्या कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभूमीवर PM मोदींच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत या दोन खासदारांचं मोदींनी कौतुक केलं, त्यावरुन आता हे मंत्री राजीनामा देतील असं वाटत होत त्यानुसार, नक्वी यांनी आपला राजीनामा दिला.
दरम्यान, कॅबिनेटची बैठक संपल्यांतर नक्वी यांनी थेट भाजपचं कार्यालय गाठलं आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी नक्वींना कुठल्याही जागेवरुन भाजपनं उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळं त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. पण भाजपमध्ये त्यांना इतर महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.