थेट सरपंच निवडीत विरोधकांच्या मानापमानाची नौटंकी; सुरेशकुमार पंधरे
सतीश भालेराव, नागपूर
गोंदिया: राज्य सरकारने आज १४ जुलै रोजी थेट सरपंचांची जनतेतून निवड व्हावी मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री यांनी आज दिलेल्या निर्णयासंबंधाने निर्णयाचे कुठे स्वागत झाले तर कुठे उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.
हिवरेबाजारचे आदर्श सरपंच यांचे मत विचारले असता त्यांनी सदर निर्णय योग्य की अयोग्य यावर आताच चर्चा केली व त्यानी खालील मुद्दे एका मराठी वृत्त वाहिनीला सांगितले.
“थेट सरपंच निवडीने पुन्हा सदस्य व सरपंचात तसेच नगरसेवक विरुद्ध नगराध्यक्ष राजकीय सामना पहायला मिळेल बऱ्याच ठिकाणी कॅप्टन विरुध्द फिल्डर असी खेळी होतीया” व त्याचे परिणाम गाव विकासाच्या बाबतीत पिचवर बघायला मिळतो व अनागोंदीत एका गटाचा सरपंच व नगराध्यक्ष तर बहूमताकडे सदस्य नगरसेवक असतात व कामे खोळंबतात व विकास निधी अखर्चित राहतो. यावर पुन्हा सरकारने बसून निर्णय घ्यावा व जुनीच पध्दत ठेवण्याचे हिवरेबाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रसार माध्यमाना बोलतांनी वक्तव्य केले.
भविष्यात याचे दुरगामी परिणाम दिसून येतील व विकासाचा खोळंबा होईल असे गावातील प्रतिस्ठित व जानकार राजकारणी तज्ञांचे मत आहे. यामुळे गावातील वजनदार जरी व्यक्ती पदावर आरूढ झाली नाही तरी त्यांच्यावतीने विरोधी असे कुटील कार्यवाह्या दिसून येतात. असे मत राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र सुरेश कुमार पंधरे यांनी व्यक्त केले आहे.