“हर घर झेंडा अभियान” यशस्वी करण्याचे आवाहन
गजानन ढाकुलकर
नागपूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत बौद्धमय करीन असे सांगितले होते. भारत सरकार ते खरे करून दाखवित आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याचा स्मृती तेवत राहाव्यात,स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना जनसामान्यांत कायम राहावी या उद्देशाने दिनांक १३/०८/२०२२ ते १५/०८/२०२२ या कालावधीत “हर घर झेंडा” शासन, प्रशासन राबविनार आहे.
ज्याअर्थी आपला भारताचा राष्ट्रीय ध्वज सुरवातीला सरकारी कार्यालयातच फडकत होता,आता मात्र स्वातंत्र्याचे ७५ वे वर्षे असल्यामुळे “हर घर झेंडा ” फडकनार आहे. त्या राष्ट्रीय झेंड्याचा मधोमध निळ्या रंगाचे “अशोक चक्र “आहे आणि ते तथागत बुद्धाचे धम्मचक्र प्रर्वतनाचे प्रतिक आहे. त्याअर्थी “हर घर झेंडा”या सरकारचा अभियान नुसार हर घरी झेंडा फडकनार आहे.
जर नोटावर अशोक चक्र आहे,
राष्ट्रीय ध्वजावर अशोक चक्र आहे,
राष्ट्रपती भवनातील खुर्चीवर अशोक चक्र आहे.
सुप्रीम न्यायालयाचा न्यायमूर्तीचा खुर्चीवर अशोक चक्र आहे.
तर आपल्या घरावरही अशोक चक्र का नाही.?? असलेच पाहिजे. असा प्रश्न सुद्धा विनोद खोब्रागडे यांनी केला आहे. अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत बौद्धमय करीन हे स्वप्न बघीतले होते.ते भारत सरकारने पुर्ण करतानां दिसत आहे. त्या बाबत त्यांचे सुद्धा विनोद खोब्रागडे यांनी आभार मानले आहे.
आपणही आपल्या घरावर भारत सरकारचा अभियान नुसार “हर घर झेंडा” लावावे. मात्र त्या राष्ट्रीय झेंडा यांचे अवमान करु नये.काळजी घ्यावी.झेंड्याचे कायद्याने पालन करावे. अन्यथा भारतीय संविधानातील अनुच्छेद ५२क.क.नुसार फौजदारी गुन्हा दाखल होतो. अशी उत्कृष्ट माहीती प्रसारीत करण्यासाठी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील तलाठी विनोद खोब्रागडे यांनी दिली.