‘अंत्री कोळी’ येथील अवैध दारू धंदे बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार
प्रमोद गाडगे
बुलढाणा: चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथे महापूर आल्याने गावात अनेक ठिकाणी मद्य विक्री केल्या जाते. अंत्री कोळी हे गाव रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असून पोलीस प्रशासनाने अवेद धंदे बंद करण्या ऐवजी पोलीसांच्या कृपा आशिर्वादाने अवेद धंद्यांना वाव मिळत असल्याचे नागरीकांकडून बोलल्या जात आहे .
गावातील दारू ही तात्काळ बंद झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही रायपूर पोलिस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढू असे गावातील महीलांनी म्हटले आहे . ग्रामीण भागातील अशा धंद्यांना जर प्रशासन तात्काळ बंद करणार नाही तर येणारी पीडी व्यसनाधीन होण्याचे संकेत नाकारता येणार नाही असा महीलांनी अंदाज बांधला आहे.
गावातील अवैध धंदे हे जर बंद होणार नसतील तर पोलिस प्रशासन आर्थिक देवाणघेवाण करूण दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतात काय असा प्रश्न गावातील नागरीकांना पडला आहे .दारू मुळे गावात शांतता भंग पस्रत चालला असून गावात वाद तंटे होण्याचे संकेत नाकारता येणार नाही .तरी याकडे पोलीसांनी तात्कांळ लक्ष घालून दारू बंद करावी अशी सरसगट नागरीकांची मागणी आहे. गावात विकल्या जाणाऱ्या दारूमुळे लहान लहान मुलं सुद्या व्यसनाधीन होत आहे .