“पावसाला येणार काय दया; अन्यथा पिके जाणार वाया”
_राधानगरी तालुक्यातील पिकांचे विदारक चित्र_
सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर/ राधानगरी: गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने तालुक्यात ओढ दिल्याने बळीराजा हतबल झाला आहे.काही अंशी अजूनही लागणीची कामे खोळंबली असून लागण झालेली भात, नाचना, भुईमूग अशी पिके पाण्यासाठी आसुसलेली असून वाळू लागली आहेत. जर आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर मात्र बळीराजाला मोठया नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
राधानगरी तालुका हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो.धरण क्षेत्राच्या पट्टयात रिमझिम का असेना पावसाची रिपरिप सुरू असते.मागील महिन्यात आठवडाभरा झालेल्या पावसाची कामगिरी पाहता म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.ओढ्या नाल्याना झालेली पाणी कमी झाले असून पाणीसाठा पूर्णपणे घटला आहे.डोंगर माथ्यावरील तरी पिकांनी माना टाकल्या आहेत.हे चित्र डोळ्यांना पाहताना मात्र गहिवरून येत आहे.
काही अंशी अजूनही भात, नाचना लागणी रखडल्या असून बळीराजा मात्र पावसाची चातकप्रमाणे वाट पहात आहे.अजूनही काही पाऊस येण्याची शक्यता वाटत नसल्याने बळी राजा निराश झाला आहे.निदान लागण झालेली पिकाना जीवनदान मिळावे अशी आशा आहे.