आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जवानांना बांधले रक्षेचे बंधन
नागपूर: शहरात नारळी पौर्णिमेच्या पावन पर्वावर आज सी आय एस एफ (CISF) च्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा साठी बाबुलाल जी टक्कामोरे स्मृति संस्थे तर्फे ओम गुप्ता व पुजा वाडबुधे यांच्या विशेष सहयोगाने तसेच मुन्ना लखेटे, अजय टक्कामोरे, अभिषेक टक्कामोरे, प्रणय टक्कामोरे याच्या तर्फे जवानांना बांधण्यासाठी राख्या देण्यात आल्या.
हा कार्यक्रम माजी नगरसेविका श्रद्धा विजय पाठक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. यावेळी उषा थेटे , जोत्स्ना साबळे , स्वाती कुळकर्णी, शैलजा कहु, मनीषा खोत, मनाली बोरकर, कीरण काळीकर,मृण्मयी घनोटे तसेच इनरव्हील क्लब आफ नागपुर ओरेंज सिटीच्या अध्यक्ष-कोमल अकबरी, सचिव-विनकी जैन,पी पी-पद्मा डेटे, प्राजक्ता, संगीता जैन,अनु जैन,रीता रावका यांनी मोलाचे सहकार्य करुन उपस्थित सर्व जवानांना रक्षासूत्र बांधले.