‘मनसे’तर्फे द.प.विभाग अंतर्गत ” हर घर तिरंगा झेंडा “जनजागृती मोहीमेला सुरुवात.
नागपूर: शहरात मनसे तर्फे दक्षिण पश्चिम विभागामध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबविले जात आहे.हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी करावी व आपल्या तिरंग्याचा मान राखावा हेच आपले कर्तव्य आहे.
याअंतर्गत शहरातील नागरिकांनी 13 आँगष्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरी तिरंगा झेंडा लावावेत. यासाठी मनसे तर्फे जनजागृती करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके, यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, विभाग उपाध्यक्ष चेतन शिराळकर, शाखा अध्यक्ष पटवर्धन गुरुजी, राजेश शाहू, पवन शाहू, सुमित्र पॉल व इतरही मनसे चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मनसे जनसंपर्क कार्यालय तुषार गिऱ्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून अभियानास सुरुवात करण्यात आली. आपल्या घरी तिरंगा फडकवावा यासाठी जनजागृती करण्याकरिता, विविध तालुक्यातील, नागरिकांशी संपर्क साधत आहे. त्या सोबतच मनसेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता, शपथ, सामान्य ज्ञान स्पर्धा, जागरूकता रॅली आदी उपक्रम घेण्यात येणार आहे. असे चेतन बोरकुटे विभाग उपाध्यक्ष दक्षिण पश्चिम मतदार संघ नागपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.