पाणी टंचाई
जल असे अनमोल
महत्त्वाचे संजीवन
त्रस्त झाले सर्वजण
पाणी टंचाई भीषण.
किती पाण्याची टंचाई
थेंब जपून वापरा
नका करू अपव्यय
बचतीचा मार्ग धरा.
निसर्गाची ही देणगी
बहुमोल असे धन
थंडगार त्या पाण्याने
शांत होई माझे मन.
समतोल निसर्गाचा
प्रत्येकांनी तो राखावा
काळजीने वापरून
थेंब पाण्याचा जपावा.
पाणी आडवा जिरवा
सगळ्यांच्या मुखी नारा
एक तरी झाड लावा
वृक्ष संवर्धन करा.
दीपककुमार सरदार
ता.लोणार जि.बुलढाणा
========