कोण रामटेकची बंद पडलेली दुपारची रेल्वे सुरू करणार?
नागपूर/ रामटेक – रामटेकची रेल्वे 1963 ला सुरू करण्यात आलेली होती. त्या रेल्वेने रामटेक पासून तर कलमनापर्यंतचे लोक प्रवास करीत होते. नोकरी करणारे प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, न्यायालयीन, कार्यालयीन कामासाठी जाणारे प्रवासी ह्या रेल्वेने तीन रुपये तिकीट पासून ते आज दहा रुपये तिकीट पासून सुखरूप प्रवास करीत होते. मात्र सकाळी सात वाजेपासून गेलेला प्रवासी रात्री दहा वाजता घरी पोहोचत होता. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने दुपारची गाडी सुरू केली. सकाळचा गेलेला प्रवासी दुपारी परत येत होता. दुपारी गेलेला प्रवासी रात्री परत येत होता.
*कोरोना पासून दुपारची बंद केलेली गाडी कोण उमेदवार सुरू करणार?*
कोरोनाच्या भयानक रोगामुळे दुपारची रेल्वे रेल्वे प्रशासनाने बंद केली ती आजपर्यंत बंद आहे. अदानी यांचा कोळसा विजकेंद्रावर पोचवण्यासाठी प्रवासी लोकांपेक्षा जास्त रेव्हेन्यू रेल्वे विभागाला मिळत असल्याने, त्यांनी पूर्ण लक्ष अदानी यांच्या कोळशाकडे केंद्रित केलेले आहे. तेव्हा रामटेक च्या लोकसभा उमेदवारांनी अदानीलाच्या मतदान मागून विजयी व्हावे. कशाला लोकांच्या दारोदारी मतदानाची भीक मागत आहे. गरीब जनतेच्या निकडीचा प्रश्न दुपारची रेल्वे सुरू करणे हे कसे तुम्हाला आठवत नाही. सावनेर चा गड हा सुनील केदारांचा असल्यामुळे तिथे सिने कलाकार गोविंदा यांना आणून गर्दी खेचण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. हे नाथ गाणे करण्यापेक्षा दुपारची रेल्वे जर सुरू केली तर लोकांना किती लाभ होईल. अदानींना तुम्ही किती डोक्यावर घ्यायचं ठरलेलं आहे. तुम्हाला मतदार महत्त्वाचे की अदानी महत्त्वाचा वाटत आहे.
लोकांनी उमेदवार दारावर आल्यानंतर आधी दुपारची रेल्वे सुरू करा तेव्हाच आमच्या दारावर या असे ठणकावून सांगितले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने नाचनाच्या कार्यक्रमावर ७२ कोटी खर्च केलेले आहे. पुन्हा ते सावनेर मध्ये सिने कलाकार गोविंदाला आणून नाच नाचया कार्यक्रम करीत आहे. हे स्वतःच्या मौज मस्ती साठी नाच नाचय या कार्यक्रम करून लोकांनाही भुलविण्याचे काम करीत आहे. मतदार मते विकासावर देत असतो नाथ नच या कार्यक्रमावर देत नसतो. हे उमेदवारांनी लक्षात घेतले पाहिजे.
*सिने कलाकार गोविंदा हे आधी भाजपाच्या उमेदवाराला पाडून खासदार झालेले होते*
नाच नाचय या कार्यक्रमासाठी पैसे मिळत असल्याने आधी काँग्रेसच्या तिकिटेवर निवडून आलेले आता भाजपा पक्षात प्रवेश करून नाच नचय या कार्यक्रम दाखवून लोकांना मते मागण्याचा प्रचार करीत आहेत. कार्यक्रमाचे महासंस्कृती कार्यक्रमात सुद्धा सिने कलाकारांनी पैसे घेतलेले आहेत. आता प्रचारासाठी सिने कलाकार निघत आहे याचे सुद्धा पैसे घेणार आहेत. ह्या कार्यक्रमाचा मतदारांना काय उपयोग?