मनाच्या आत’ भावनांची शिल्पे: वृंदा करमरकर

मनाच्या आत’ भावनांची शिल्पे: वृंदा करमरकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

मन एक अनाकलनीय असे गूढ. ते असते, पण दिसत नाही. असे वाटते जवळ आहे तर दूर पळते. त्याला बांधता येत नाही. मनाबद्दल सांगायचे झाल्यास जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणा ऱ्या ज्ञान  विचार, मत,  स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी निर्माण होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्वगोष्टी मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत. मन हे भावभावनांचा दर्पण. कधी आनंद, कधी दुःख, कधी आशा कधी निराशा, कधी उत्साह तर कधी उदासी असे विचार मनात निर्माण होतात….पण या मनाचा थांग कुणालाच लागत नाही. मन दिसतही नाही आणि आपल्या ताब्यात ही रहात नाही.कधी आभाळाला भिडते तर कधी जमिनीवरील गवतावर लोळण घेते. कधी प्रिय व्यक्तीच्या विरहाने उदास होते.

*मनतरंग स्वरात भिजले*
*मातीचे गाणे गंधाळले*
*आत मनाच्या माझ्या नकोशा आठवणी*

आपले अनेक अनुभव, आठवणी मनाच्या आत जपून ठेवलेल्या असतात. आपलं जीवन अनेकविध घटनांनी भरलेलं असतं. त्या घटनांचा बरावाईट परिणाम आपल्या मनावर होत असतो.समजा एखादा चित्रकार आनंदी असेल तर त्यानं चितारलेलं चित्र सुंदर असतं.पण तो जर उदास, निराश असेल तर त्यानं रेखाटलेलं चित्र वाईट, उदास असंच असेल. आनंद, दुःख, राग,लोभ, हास्य या सर्व भावनांचा रंग मनाच्या आत पसरलेला असतो. आपण सदैव आनंदी रहाणं गरजेचं आहे. पण कधीतरी आपल्या मनात आपण डोकावलं पाहिजे. कारण माणसाचं मन कधी खोटं बोलत नाही. आपण खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे

*आत मनाच्या माणसा*
*शोधून पहा तू जरा*
*आहे का माणुसकीचा झरा*

मन उत्साही रहावं यासाठी सकारात्मक विचार करण्याची सवय केली पाहिजे. तसेच स्वयं सूचना सुध्दा त्यासाठी उपयोगी ठरते. आपल्या मनाच्या आत आपल्या भावनांची शिल्पं असतात असं जाणवेल.अर्थात ही काल्पनिक असतात. पण आनंदी रहाणं, चांगला विचार करणं तर आपल्या हातात आहे. आनंदात जीवन जगणं हेच खरं ईश्वर चिंतन आहे.

आदरणीय राहुल सरांनी आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी दिलेला विषय ‘आत मनाच्या’ चिंतनीय आहे. शिलेदारांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पण सर्वच शिलेदारांनी परीक्षण आवर्जून वाचावं.आपल्या समूहात सातत्याने स्पर्धा होतात.सर्वच सहप्रशासक तळमळीने परीक्षण लिहितात. त्याला शिलेदारांनी प्रतिसाद दिला पाहिजे.

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles