मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ?
मुंबई: राज्यसभेसाठीच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मोर्चेबांधणी जोरात सुरु असून शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांची वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यात पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असे वक्तव्य केले आहे तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच होऊ दे असा नवस खासदार सुप्रिया सुळे नवस फेडणार आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार चालवत आहेत. पुढचा मुख्यमंत्री जर सेना किंवा राष्ट्रवादी या पक्षाचा व्हावा असे जर यांच्या नेत्यांना वाटत असेल तर महाविकास आघाडी सरकार मध्ये मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार काय ? असा सवाल मनसे नेते गजानन काळेयांनी केला आहे.
महाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत असल्याने जूनमध्ये निवडणुकांची रणधुमाळी असणार आहे. यासाठी महाराष्ट्रात काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपानेही आपले उमेदवार निश्चित केले असून यावरून दावे प्रतिदावे सुरु आहेत.