उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा नंतर आशा वर्करमध्ये पसरली निराशा

उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा नंतर आशा वर्करमध्ये पसरली निराशा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, संवेदशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त अडीज वर्ष मुख्यमंत्री असताना आशा वर्कर यांना ३५०० रू. तसेच गटप्रवर्तक यांना ४७०० रू. वाढ दिली.

परंतु देवेंद्र फडणवीस पूर्ण पाच वर्ष असून सुद्धा एक रुपये वाढ दिलेली नाही केंद्र शासनाने सुद्धा कोरोनाच्या संकटामध्ये आशा वर्कर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभवल्या नंतर सुद्धा कोणती वाढ दिलेली नाही. उद्धव ठाकरे शासनातर्फे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना किमान वेतन देण्याच्या प्रस्ताव पारित करण्यात येत होता. परंतु ईडी व सीबीआयच्या धाकाने शिवसेनेचे 40 आमदार फोडून सरकार पाडण्याचे षडयंत्र रचून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले.

मागील पाच वर्षे घालवल्यानंतर सुद्धा कोणताही मोबदला आशांना न देणारे मुख्यमंत्री आशांच्या कामाची कदर करणार का ? हे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे नवीन सरकारवर विश्वास राहिलेला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निराशा सतावत आहे. नवीन मुख्यमंत्री यांनी आशांच्या कामाची दखल घेऊन किमान वेतन देण्याची मागणी मंजूर करावी ही आशा वर्कर अपेक्षा बाळगून आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles