केळझर येथे अनेकांचा मनसेत प्रवेश
गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी
नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून ज्या उत्साहाने मनसेत सहभागी झाला आहात तोच उत्साह आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न सोडविताना ठेवा , तेथील लोक नादान प्रस्थापित राजकारण्यांची दुकानदारी बंद करून तुम्हाला नक्कीच स्वीकारतील असे प्रतिपादन मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे प्रवेश सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील अनेकांनी मनसेत प्रवेश केला.
या सर्वांचे स्वागत हेमंत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. विकासाला अडसर ठरत आलेल्या जाती पातीच्या राजकारणा पेक्षा मनसे अध्यक्ष राजसाहेब यांचा विकासाभिमुख नवनिर्माणाचा विचार कधीही राज्याला प्रगती कडे नेणारा आहे. इतर पक्ष मतांच्या लाचारी साठी जाती पाती चा वापर करून घेण्यात मग्न असताना केवळ मा.राजसाहेब हेच एकमेव नेते आहेत की विकासात्मक भूमिका मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसतात असेही हेमंत गडकरी यांनी उपस्थित नवख्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितले व वर्धेच्या राजकीय पटलावर चांगल्या कामांद्वारे आपली ओळख निर्माण करा असे आवाहन ही केले.
याप्रसंगी मनविसेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर,पत्रकार महाराष्ट्र न्युज सेवन चे संपादक व महाराष्ट्र सैनिक मंगेश चौरे , वाहतूक सेना वर्धा जिल्हा संघटक रमेश घंगारे ,सेलू तालुका अध्यक्ष विवेक धोंगडे, शिवसेनेचे माजी पदाधिकारी प्रदीप शिंगरू प्रकाश ढोके, व अन्य व्यासपीठावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश चौरे यांनी तर संचलन संदीप रघटाटे यांनी केले.
प्रवेश करणाऱ्या अनेकांमध्ये वर्धा शहरातील प्रदीप शिंगरू व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता,प्रवेश करणाऱ्या मध्ये काही मुस्लिम युवकांचा सुद्धा सहभाग होता,या कार्यक्रमासाठी मंगेश चौरे व शुभम दांडेकर यांनी पुढाकार घेतला,हरीश भस्मे,हंसराज घरडे,सतीश जगताप विकेश नागोसे,गणेश साहारे,शुभम शिंदे,या पदाधिकाऱ्यां सह अनेकांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले, केळझर नगरीत आगमन होताच हेमंत गडकरी व मनसे पदाधिकारी यांनी येथील प्रसिद्ध विघ्नेश्वर गणेशाचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली.