मातंग समाजातील विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने सत्कार
सभांजीनगर: राज्यव्यापी असलेल्या ‘मातंग एकता आंदोलन’ या सामाजिक संघटनेच्या औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, मा.अशोक शिरसाठ यांची जिल्हासचिव पदी निवड झाल्याबद्दल, मा.किशोर तुपे यांची शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समाजातील विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ नेते तथा आरपीआय (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष मा.संजय भाऊ ठोकळ, माझे मार्गदर्शक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा.राजु आहिरे सर, आरपीआय चे शहराध्यक्ष तथा युवा नेते मा.रवी चांदणे, वंचित बहुजन आघाडीचे मध्य शहर सचिव मा.विनोद साबळे, यांचे समवेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी, लहुजी शक्ती सेना, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय (आठवले गट) मानवहित लोकशाही पक्ष, जय श्रीराम मित्र मंडळ आदी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.