मनसेच्या उद्योजकता २०२२ च्या मेळाव्याचा अनेकांनी घेतला लाभ
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना हींगणा विधानसभा क्षेत्रातर्फे वानाडोंगरी येथील पालकर सभागृह येथे भव्य उद्योजकता मेळावा २०२२ पार पडला. ग्रामिण भागातील जनतेत उद्योजकते बद्दल जागृकता निर्माण व्हावी व ग्रामिण समाजमन उद्योजकतेकडे वळून आर्थिकरीत्या सक्षम व समृद्ध व्हावा या प्रामाणिक हेतुने सदर मेळावा आयोजीत करण्यात आला.
उद्योजकता मेळाव्याचे उदघाटन मनसेचे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंतभाऊ गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला संबोधीत करतेवेळी रोजगार मेळाव्यात आलेल्या रोजगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे व शासनाच्या योजनांची माहिती दिली त्याचा सभागृहातील काहींना जरी स्वयंसिद्ध होण्यासाठी लाभ झाला तरी आम्हा मनसे पदाधिकाऱ्यांना मनापासून आनंद होईल व मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या सामाजिक सेवेचा संस्कार कृतीत उतरल्याचे मानसिक समाधान लाभेल असे प्रतिपादन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांनी केले, नवउद्दोजक जेव्हा उद्योग उभारणीसाठी बँकेचे सहकार्य मागतो तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी झारीतील शुक्राचार्य ही भूमिका घेऊ नये तसेच बेरोजगार व्यक्ती ने प्रसंगी मिळेल त्या कामाचा स्वीकार करावा पण नौकरी साठी कुणालाही पैसे देऊन आपली फसवणूक करून घेऊ नये असेही हेमंतभाऊ गडकरी यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री. वानखेडे साहेब ( जिल्हा व्यवस्थापक , खादी ग्रामोद्योग मंडळ), श्री.आठवले साहेब ( अधिकारी, उद्योग भवन ), श्री. हेमंत वाघमारे( प्रकल्प अधिकारी, MCED, हींगणा ), श्रीमती योगीताजी काकडे ( जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले महामंडळ), श्री. हृदयजी गोडबोले ( प्रकल्प अधिकारी , बार्टी ), श्री. उपरीकर साहेब ( उपसंचालक , कृषी विभाग ), यशस्वी उद्योजिका श्रीमती. सुप्रियाजी कुर्वे , चार्टर्ड अकाँटंट श्री.कपीलजी माहेश्वरी, नायक मल्टीपर्पज निधी बँकेचे चेअरमन श्री. चंदुजी पाटील यांची उपस्थीती असुन शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण व अर्थनियोजन संबंधी अमुल्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष योगेश चनापे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती म्हणुन जिल्हाध्यक्ष श्री. कीशोर सरायकर, शहर अध्यक्ष अजय ढोके , तसेच मनसेचे प्रमुख पदाधिकारी श्री.सचिन धोटे,अजय सिरसवार,श्री.तुषार गिर्हे, पटवर्धन गुरुजी, गजानन टीपले,श्री. चौरसीया ,धनराज ठाकरे उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रोशन वडुले, गणेश बरवटकर, मुकेश देवगडे, विजय कामटे,निलेश्वर भोयर,सोपान टीकार,अमर खंडाळ, अर्जुन सिंग, श्रीकांत बुधे, गौरव लांडगे, अविनाश चिंचुलकर, रोशन निघोट, विनोद समर्थ,चेतन मानकरआकाश निघोट,सागर शेंद्रे, नितीन भिवापुरे,राकेश सिंग,राजु अढावु , विनोद समर्थ,अरविंद फुसे, निलेश ईंगळे, ईत्यादींनी अथक परीश्रम घेतले.