सांस्कृतिक समृद्धीत कवींचे योगदान अद्वितीय; कवी सतीश सोळांकूरकर

सांस्कृतिक समृद्धीत कवींचे योगदान अद्वितीय; कवी सतीश सोळांकूरकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर

ठाणे: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात कवी -लेखकांचे योगदान अद्वितीय आहे” असे मत प्रसिध्द कवी सतीश सोळांकुरकर यांनी शारदा प्रकाशनाच्या कवी प्रसाद कुलकर्णी लिखित ‘शब्दसरी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या संचालिका कवयित्री प्रज्ञा पंडित, कतार येथील महाराष्ट्र मंडळाच्या महासचिव कवयित्री मनिषा देशपांडे- पालवे, शारदा प्रकाशनचे प्रा.संतोष राणे, कवी प्रसाद कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सतीश सोळांकुरकर पुढे म्हणाले,” ज्ञानेश्वरांपासून केशवसूतांपर्यंत ते आजच्या सर्वच कवी -लेखकांच्या सांस्कृतिक योगदानामुळे महाराष्ट्र वैचारीक दृष्ट्या समृद्ध आहे. अनेकानेक कविंचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. प्रसाद कुलकर्णी यांच्या ” शब्दसरी” या सांस्कृतिक समृद्धीत भर घालतील ” अशा शब्दात त्यांनी कुलकर्णी यांच्या कवितेचा गौरव केला.

श्रोत्यांच्या आग्रहाखातर ‘वडिलोपार्जित आई’ ही कविता सादर करून त्यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. प्रमुख पाहुण्या कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “कविता काळानुरूप बदलते आहे, आजची कविता नवे संदर्भ लेऊन पुढील पिढीला साद घालेल” यावेळी त्यांनी ‘शब्दसरी’ संग्रहातील ‘बंदिस्त मन’ या कवितेचे अभिवाचन केले.कवयित्री मनिषा देशपांडे पालवे यांनी ‘मनात होती कविता’ ही कविता सादर करून कवी प्रसाद कुलकर्णी यांना पुढील काव्य प्रवासास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसाद कुलकर्णी रचित गणेश वंदना सौ. अपूर्वा कुलकर्णी यांनी सादर केली. ‘शब्दसरी’ संग्रहातील काही कविता
‘ स्वत्व ग्रुप’ चे प्रसाद भावे, रोहिणी कुलकर्णी, आश्लेषा राजे यांनी सादर केल्या. स्वतः कवी प्रसाद कुलकर्णी यांनी ‘ हे कविते’ या कवितेचे अभिवाचन केले, त्यावर आश्लेषा राजे यांनी भावमुद्राभिनय सादर केला. या अभिनव सादरीकरणाला रसिकांची विशेष दाद मिळाली. शारदा प्रकाशनचे प्रा. संतोष राणे यांनी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. आश्लेषा राजे यांनी केले. भर पावसात प्रसाद कुलकर्णी मित्र परिवार व रसिक ठाणेकर या प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles