आठवणी
बोलता बोलता अचानक
आठविले काही असे
ठरविले जे कधी आठवायचे नाही….
विस्मृतीत गेलेल्या शब्दांनी
दब्या दब्या पावलांनी
हळूच प्रवेश केला मनात
काही ना काही, थोडं थोडं
मग आठवत गेलं रोजच
भूतकाळातली पान बंद करता करता
आठवणीच्या वाऱ्यांनी ती,
पुन्हा अलगद उघडली जातात…
आणि ,नको असलेल्या आठवणी
पुन्हा ताज्या होतात
मग,अश्रुच्या धारेत मी
माझ्यापासून पुन्हा दूर जाते
आणि मग सुरु होतो
स्वतःलाच शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न..
सीमा वैद्य
वरोरा, जि. चंद्रपूर
======