चैतन्य
चैतन्य स्फुर्ती जागवू चला
फुले शाहू आंबेडकरी चळवळ
जनसामान्यात प्रसार करण्याला
एक मनाने वसा घेवू चला.
शिक्षण होवू कसोटीत उतरू
आता मार्ग न राहायचे.
मानाच्या जागा परिश्रमाने चढू
आभार मानू महामानवाचे
विचार- बुद्धीची क्षमता वाढवू
नवेनवे आव्हान पेलू चला
दाही दिशांत कृतात गाजवू
जीवनाचे मोल चला चुकवू
माणुसकी धर्म न विसरायचा
उपेक्षित तांस खरा न्याय देवू
देशाची मान उंच ठेवू
देश प्रगती पथावर आहे न्यायचा
जुन्या भाकड कथांवर विश्वास नेवू नका
प्रत्यक्ष असण्यावर विश्वास ठेवा
स्वाभिमान शिक्षण आत्मविश्वास ज्यांनी दिला
त्यांना कधीही विसरू नका’
मायादेवी गायकवाड
ता.मानवत, जि.परभणी