आयुष्य
सुगंधी हा वारा
जेव्हा स्पर्शून जातो
कल्लोळ भावनांचा
अबोल करून जातो
शब्द होतात मुके
होतात आठवणी ताज्या
गत दिवस आठवतांना
वाटते हवीशी तिच मजा
कधी चुकीची नाती
विनाकारण कधी माफी
खूप रडून झाल्यावर
प्यावी एकट्यानेच कॉफी
कधी वेडावतं मन
पाखरू बनून उडते
थांबेल काय ही वेळ
भेटून भूतकाळाला येते
किती कठोर प्रयत्न
वाळविण्या अश्रूंना करते
वारा मात्र सुगंधी
आठवणींचा संदेश घेऊन येते
तो काळ ‘काल ‘ होता
हा काळ ‘आज ‘ आहे
आयुष्याच पुस्तक
एक ‘सस्पेन्स स्टोरी ‘ वाटते…
सीमा वैद्य
वरोरा,जि. चंद्रपूर