पुण्यात रागरंग रागावर आधारीत रंगली मैफिल
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे: मीरा प्रस्तुत पुण्याच्या एसेम जोशी सभागृहात रागरंग या रागांवर आधारित सिनेगीत, भावगीत , भक्तीगीत अशा स्वरूपाच्या गाण्यांचा एक सुंदर सुरेल कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे ओघवते, अभ्यासपूर्ण निवेदन नीला यांनी केले..प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांनी कार्यक्रमास विशेष रंगत आणली. मनिषा, रेखा, नीला, शिल्पा आणि अनुराधा या सुरिल्या पंचकन्यांनी रागाची ओळख करून देत त्यावर आधारित गाणी, मेलडी सादर करत श्रोत्यांची मने जिंकली.
नीला आणि शिल्पा यांनी गायलेले गुलजार यांचे दिल घूं घूं करे आणि मनिषाने गायलेले अमृताहूनी गोड ही गाणी अतिशय सुंदर झाली..अनुराधाने गायलेले गीतरामायणातील पद आणि रेखाताईंचं जब दिप जले हे विशेष उल्लेखनीय.पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या मनिषाच्या लावणीने कार्यक्रमात बहार आणली.
या रंगतदार कार्यक्रमास सुयोग्य साथ धनश्री गिजरे.. हार्मोनियम आणि विजय कुलकर्णी..तबला अशी लाभली. एका सुंदर रंगलेल्या संस्मरणीय मैफिलीला जमलेल्या पुणेकरांनी मनसोक्त दाद दिली.
वसुधा इंटरनॅशनलचे संस्थापक
आणि आंतरराष्ट्रीय कलावंत
डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि
अध्यक्ष वसुधा नाईक यांनी
सर्व कलाकारांचे मनापासून
अभिनंदन केले आहे.