महिलांचा विकास झाला तर राष्ट्राचा विकास होईल; डाॅ.मधुसूदन घाणेकर

महिलांचा विकास झाला तर राष्ट्राचा विकास होईल; डाॅ.मधुसूदन घाणेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: “तौलनिक दृष्ट्या विचार करता महिलांमधे सहिष्णूता अधिक असते. समाजाचे सुखदुःख समजून घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा अधिक असते.ती समाजाला दिलासा देते.समाजाच्या दुःखावर हळुवार फुंकर घालते. आणि म्हणून महिलांचा विकास सर्वत्र झाल्यास राष्ट्राचा विकास नक्की घडेल “असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पहिल्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.

महिला सन्मान तर्फे विविध क्षेत्रातील 6 कर्तबगार महिलांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभ हस्ते फ्रेंडस इंटरनॅशनल सेच्युरियन कल्चरल ॲवाॅर्ड -2024 पुरस्कार प्रदान करुन गौरवले गेले.सदर सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.घाणेकर बोलत होते.मंदा नाईक (सामाजिक,साहित्य क्षेत्र), भारती महाडिक( शहर कार्याध्यक्ष,भारतीय जनता पार्टी-महिला आघाडी), सारिका सासवडे (मधमाशा वाचवा चळवळ), वसुधा नाईक (अध्यक्ष, वसुधा इंटरनॅशनल) , दीपाराणी गोसावी ( साहित्य आणि कला) , सुचेता प्रभुदेसाई( युवा विकास) यांना जाहिरपणे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी कवयित्री कल्पना बापुचे, सुधाकर नाईक,आनंद जोशी, गणेश जामखेडकर , प्रिया दामले आदि मान्यवर उपस्थित होते.डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी विशेषांकही याप्रसंगी प्रकाशित करण्यात आला.भारती महाडिक यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles