वणव्याचा दाह
सोसावेना, मानवाला
तप्त,वणव्याचा दाह,
वने तोडली,स्वार्थापाई
म्हणून, लागली आह.
पशुपक्षी,प्राणी सारे
झालें,उन्हाने हैरान,
वृक्षाविना, धरनी माय
दिसते, आहे भयाण.
भुजलसाठा,संपला
भटकंती, दाही दिशा
पाण्याविना,व्याकुळलो
उरली न,पावसाची आशा.
वाटसरू शोधतो आज
उन्हापासून निवारा,
मिळेना काही त्याला
वृक्षराजीचा,सहारा.
जनता झाली,त्राहीत्राही
अंगाची,काहीली झाली,
सिमेंटच्या,जंगलामध्ये
पशूपक्षी होरपळून गेली.
आता तरी,समजून घ्या रें
विचार नेक,ध्यानी धरूया,
उद्याच्या,शीतल सावली साठी
एक तरी, झाड लावूया.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
============