
कोरोनाबाबत नवे निर्देश; मास्कसक्ती नाही
राज्यात काही ठराविक जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे. आता कोरोना रूग्णसंख्येत वाढ होवू लागली, त्यामुळे केंद्राने एक पत्र दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून मास्क वापरण्याचे आवाहन करत असून सक्ती नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
पुणे येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. केंद्राने दिलेल्या पत्रामध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनाचे पालन करावे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. रेल्वे, बस, सिनेमागृह, रूग्णलाय, शाळा, काॅलेज यासाह सार्वजनिक ठिकाणी मास्क लोकांनी वापरावा. परंतु मास्कसक्ती नाही. पुढील 15 ते 20 दिवसानंतर परिस्थिती पाहून मास्कसक्ती करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.