राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा मनसे वाडीतर्फे निषेध

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा मनसे वाडीतर्फे निषेध



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महाराष्ट्रातील मराठी लोकांचा अपमान सहन केल्या जाणार नाही_

नागपूर: महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे .अनेक थोर महापुरुषांनी आपले बलिदान या महाराष्ट्रासाठी अर्पण केले त्यामधे डॉ बाबासाहेब आंबेडकर, श्री छत्रपती शिवाजी, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जिजाऊ माता, सावित्री बाई फुले, अण्णा भाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज महाराज, अशा सर्व महापुरुषांचे महत्व पूर्ण योगदान या धरतीला लाभले आहे.

राज्यपाल ह्या पदाचा सर्व जाती जमातीची जनता मान राखते हे एक आदर्श पद आहे. संविधानिक पद आहे.आणि ह्या पदाचा संपूर्ण स्तरावर मान राखला जातो परंतु मुंबई येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असताना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी गुजराती लोकांनी मुंबई सोडून गेल्यास . मुंबई ची आर्थिक स्थिती कमजोर होईल. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून गुजराती आणि इतर गैर महाराष्ट्रीयन मुंबई सोडून गेल्यास मुंबई नेस्तनाबूत होईल, अशी सार्वजनिक समाजामध्ये फूट पाडणारी वक्तव्य वापरून संविधानिक पदावर राहून संविधानाचा अपमान केला आहे.

त्यांच्या या अपमानास्पद वक्त्व्यामुळे महाराष्ट्रात मराठी जनतेमध्ये तेड निर्माण होऊन आपसी सलोख्याचे समतावाद टिकून राहणार नाही. ज्या संविधानानी भगतसिंग कोशारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले व संविधानिक अधिकाऱ्यानी अशा प्रकारचे वक्तव्य करणे अशोभनीय आहे .संविधानाचे उल्लंघन आहे असे मत वाडी येथील मनसेच्या अनिल पारखी, दीपक ठाकरे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्रीयन मराठी जनतेची माफी मांगावी अशी मागणी मनसेनी वाडी पोलिस स्टेशनला केली आहे .अशा प्रकारचे कृत्य कोणी प्रतिष्ठित सुशिक्षित नेत्यांनी संविधानिक वरिष्ठ सर्व अधिकारी यांनी करू नये .महाराष्ट्राचा अपमान व मराठी जनतेच्या भावना कोणी दुःखव नये मराठी जनता माफ करणार नाही.

गुजराती लोकांनी मुंबईत येऊन आपले धंदे मराठी जनतेच्या भरोश्यावर मोठे केले मोठ्या प्रमामात वाढ केले आर्थिक बाजू बळकट केली महाराष्ट्रतील जनतेनी प्रेम दिले आणि कोणीही येऊन महाराष्ट्राचा व मराठी माणसाच्या विरोधात कोणीही “बकबक” करून जावे हे कृत्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडी कधीही सहन करणार नाही .मराठी जनतेच्या भावना दुखवणार नाही.याची खबरदारी पुढे सर्वांनी घ्यावी अन्यथा मनसे स्टाईलने जशास तसे उत्तर देण्यात येईल.

मनसेचे सरचिटणीस मा हेमंत भाऊ गडकरी, मनसे जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे चे तालुका संघटक श्री दीपक ठाकरे ,मनसे चे तालुका अध्यक्ष नागपूर श्री अनिल पारखी, यांच्या नेतृत्वाखाली ओंकार तलमले , मुकेश मुंडले, विठोबा घुरडे, बबलू सिंग,अतुल मिश्रा, संदीप माने, संतोष पाल, सूरज भलावी,वैभव तुपकर,अश्विन कोडापे,अजिंक्य वाघमारे, नितीन पिठोरे, आकाश बाबर ,शुभम कळंबे, गिरीपुंजे मनसेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles