निलंबित सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ‘टोके’नी काढले पोलिसांचे वाभाडे

निलंबित सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ‘टोके’नी काढले पोलिसांचे वाभाडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई प्रतिनिधी

मुंबई: श्रीमती मंदा ताई यांनी आवाज उठवला तर मीडियात जोरदार चर्चा का ? तर त्या आमदार लोक प्रतिनिधी आहेत, फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून मग मी यांच्या अगोदर मे उच्च न्यायालयात याच कारणास्तव भ्रष्टाचार प्रकरणांत स्वखर्चाने मे उच्च न्यायालय मुंबई येथे स्वखर्चाने याचिका दाखल केल्यावर हेच विरोधी पक्ष नेते व लोकप्रतिनिधी आमदार आणि इलेट्रॉनिक व प्रिंट मीडिया मूग गिळून का गप्प आहेत. यांना ही याचिका मे उच्च न्यायालय मुंबई येथे जनहितार्थ करण्यास कोणती बांधा आहे.

मी पोलीस दलातील भ्रष्टाचार करणारांच्या विरोधात आवाज उठवतो तक्रारी करतो. मे उच्च न्यायालय मुंबई येथे जनहितार्थ याचिका दाखल करतो, कशा करता ? तर पोलीस दलाची बदनामी व प्रतिमा या भ्रष्टाचार करणाऱ्या काही ठराविक सनदी अधिकारी व त्यांचे राजकारणी लोकप्रतिनिधी, विविध पदांवरील मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी यांच्या मुळे होते की माझ्या आवाज उठवण्याने, तक्रार केल्याने तद्नंतर ही यांनी योग्य कारवाई केली नाही तर मा न्यायालयात याचिका दाखल केल्याने होते हा माझा रोख ठोक सवाल या व्यवस्थेतील प्रामाणिक इमानदार लोकप्रतिनिधी, शासकीय सेवेत असणाऱ्या व भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी व त्यांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या टोळी तील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना !!

पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या ठराविक सनदी अधिकारी व इतर पदांवरील अधिकारी कर्मचारी यांना याच महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील प्रत्येक पक्षातील पक्ष प्रमुख, मा मंत्री, मा आमदार मा खासदार यांचा पाठींबा असल्या शिवाय हे भ्रष्टाचार करणारे इतके मुजोर व बेकायदेशीर कामात कदापि सक्रिय राहणार नाही आणि हे मी सांगण्या पेक्षा अधिवेशन काळात जे काही तारांकित प्रश्न पोलीस दलातील भ्रष्टाचार व मनमानी कारभार करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले ते समस्त महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने पाहिले व ऐकले आहे.

इथं सोयीनुसार राजकारण करून प्रत्येक राजकीय पक्ष मग ते सद्या सत्तेत असणारे व गत काळातील त्या सर्व मा मंत्री मंडळ व पक्ष प्रमुख यांनी स्वतःच्या गुन्हेगारीचा भ्रष्टाचार कारभाराचे वाभाडे कोणी काढू नये या करता पोलीस दलातील काही ठरावीक सनदी अधिकारी, सर्वच पदांवरील आणि मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी यांना आपल्या वळचणीला बांधण्याचे बेकायदेशीर काम करून बदली नियमाना हरताळ फासून एक स्वतंत्र पोलीस यंत्रणाच स्वतःच्या गरजेनुसार उभी केलेली आहे हे मी सांगण्याची नक्कीच गरज नाही. यांच्या या बेकायदेशीर नंगा नाचाचे बेकायदेशीर भ्रष्टाचार कारभाराचे यांच्या चुकाच्या कामाचे कोणी गारुड वाजवण्याचे सुरू केले की तो राष्ट्र द्रोही ठरवला जातो, त्याला मारले जाते, त्याच्यावर खोटे गुन्हे राजकीय दबावापोटी दाखल केले जातात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles