जयदीप कवाडे यांचा आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा
_बीड येथील कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद_
✍️रजत डेकाटे, प्रतिनिधी
बीड: शहरात पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या उपस्थितीत नुकताच कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे आयोजक अनिल तुरुकमारे मराठवाडा सचिव यांनी प्रास्ताविक व भाषणे केले यावेळी प्रसंगी मंचकावर गणेश भाई उनवणे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राजेंद्र हिवाळे जालना जिल्हा अध्यक्ष, अरुण सवाई ज्येष्ठ नेते शेख फिरोज, श्रीरंग वाघमारे, प्रा. आतुल देवडे अशोक सटले,नामदेव इनकर, दत्तात्रेय सौंदरमल आदी उपस्थित होते.
जयदीप कवाडे यांनी चौफेर समाचार घेतल्या नंतर आघाडी सरकार यातील मित्र पक्षाचा समाचार घेतला, आघाडीतील अनेक मंत्री हे भ्रष्टाचारा खालील अडकले आहेत. त्यामध्ये आंबेडकरवादी विचारसरणी घेऊन पुढे जाणार आहे आघाडी मित्र पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे हे त्यांना फक्त मतदाना पुरते पाहिजेत इतर ठिकाणी नको आहे तशीच परिस्थिती सध्या तरी दिसते आहे. आघाडी सरकारने पागडी धर्म पाळला पाहिजे आघाडीतील मित्रपक्षांना सोबत घेऊन काम केले पाहिजे; परंतु तसे होताना दिसत नाही.
बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांनी तर सर्वात पुढे बाजी मारली आहे,ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे, अशा सामाजिक न्यायमंत्री कडून न्यायाचीी अपेक्षा करणे चुकीचे आहे. सर्वसामान्य वंचित उपेक्षित अन्यायग्रस्त लोकांना त्यांच्या कडे भेटण्यास वेळ नाही, बीड जिल्ह्यात सर्वात जास्त अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, बीड जिल्ह्यातील स्त्री ही सुरक्षित नाही, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले दिसत आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे,
या कार्यक्रमाला जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरून अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठवाडा सचिव अनिल तुरूकमारे यांनी केले या मेळाव्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत सत्कार पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले.या मिळाला यशस्वी करण्यासाठी बीड येथील पदाधिकारी कार्यकर्ते त्यामध्ये शेख फिरोज श्रीरंग वाघमारे प्रा. आतुल देवडे ,अशोक सटले, नामदेव इंनकर,दत्तात्रेय सौंदरमल आदी घेतले आहेत.