सोनमाळा-डोंगरगाव रेती घाटावर जेसीबीच्या सहाय्याने भरदिवसा वाळू उपसा
भंडारा: जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात चुलबंद नदीचे वरदान लाभलेले असून मर्हेगाव, भुगाव, सोनमाळा, डोंगरगाव आदी असे विविध रेतीचे घाट आहेत यात अजूनही वाळूचा उपसा सुरूच आहे.
तालुक्याला लाभलेल्या चुलबंद नदी पात्रामधून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अनेकविध प्रयत्न करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून ही वाळू उपसा सुरूच आहे.तर , तालुक्याला लाभलेल्या जैवविविधतेची लूट सर्रासपणे सुरू आहे.भंडारा जिल्ह्याला पांढरी शुभ्र वाळूचे वरदान लाभलेले असून याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.या वरदानाचा फायदा शासनाला कमी आणि रेती माफियांना जास्त होत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
रेती घाटाचे लिलाव न झाल्याने कारवाईसाठी तत्परता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले सुद्धा झाले आहेत.तरीसुद्धा रेती माफियांचे चांगले भले होत आहे.मागील काही महिन्यात तालुक्यात तहसीलदारांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती.यात कर्मचाऱ्यांवर हल्ला सुद्धा झाला होता.यात ताजेप्रकरण असतांना पवनी तालुक्यात भल्या पहाटे एस.डी. ओ.वर सुद्धा जीवघेणा हल्ला करण्यात आला मात्र तरी सुद्धा अवैध वाळू उपसा काही जिल्ह्यासह तालुक्यात थांबू शकला नाही.महसूल विभाग गौणखनिज रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना कोणाच्या आशीर्वादाने हे काळेधंदे सुरू आहेत ? असे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
असाच प्रत्यय लाखनी तालुक्यातील सोनमाळा आणि डोंगरगाव घाटावर भर दिवसा आणि रात्रीला सुद्धा वाळूचा उपसा जे.सी.बी च्या सहाय्याने ट्रॅक्टर आणि टिप्पर मध्ये काढून आजू-बाजूच्या परिसरात काढली जाते आणि सायंकाळ पर्यत गोळा केलेला रेती साठा भुगाव-सानगळी मार्गे पोबारा केला जातो असे विश्वसनीय वृत्त आहे तरी याकडे संबंधित विभाग कानाडोळा केला जात आहे.या मुळे तालुक्यातील जनतेचे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.