राज्यात नागपूर बोर्ड दुस-या स्थानी; निकालाची टक्केवारी ९६.५२%
नागपूर: महाराष्ट्रातील सर्व बोर्डात बारावीचा निकाल आज बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर झाला आहे. कोकण विभागानंतर नागपूर विभागाचा निकाल हा ९६.५२ टक्के लागला असून राज्यात नागपूर विभाग दुस-या स्थानी आहे.
यावर्षी नागपूर विभागातून एक लाख ६० हजार २८ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील एक लाख ५९ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यातील १ लाख ५३ हजार ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९६.५२ टक्के इतकी आली आहे.
या शैक्षणिक सत्रात नागपूरसह राज्यभरात बारावीच्या परीक्षा गृह महाविद्यालयातील केंद्रांवर घेण्यात आल्या. कुठलाही गैरप्रकार यंदा घडल्याच्या प्रकार दिसून आला नसल्याचे शिक्षण मंडळाने नाकारले असले तरी, निकालात झालेली ही वाढ हे सिद्ध करते. यंदाही संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे.