विधान परिषद निवडणूक रिंगणातून सदाभाऊ खोत यांची माघार
मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज सदाभाऊ खोत यांनी भेट घेऊन महत्वाचा निर्णय घेतला आहे. अखेर आज विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी चांगल्याच हालचाली वाढल्या होत्या. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आमदाराची महत्वाची बैठकही घेतली होती. तर दुसरीकडे भाजपकडून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी सर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर यांनी आपला अर्ज मागे घेत, विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे,
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात होते. भाजप मात्र सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान खोत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला.
भाजपकडून आता पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. दरम्यान आज विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या निवडणुकीत कोण कोण अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता त्यास पूर्णविराम लागला आहे.