नागपुरात ओबीसी जनजागृती यात्रेचा ३० जून रोजी आरंभ
_संविधान चौकातून संसद भवन पर्यंत_
नागपूर: ओबीसी जनजागृती समितीचे मुख्य संयोजक योगेश ठाकरे व यशवंत तेलंग आपणास कळविण्यात येत आहे की, ओबीसी जनजागृती यात्रा सविधान चौकातून संसद भवन पर्यंत 30 जून 22 ला आरंभ होऊन ती पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यात फिरून 25 ऑगस्टला संसद भवन नवी दिल्ली येथे ही जनजागृती यात्रेचे नेतृत्व योगेश ठाकरे, यशवंत तेलंग करतील.
ओबीसी जनजागृती यात्रे मार्फत 21 लाख स्वाक्षरी निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना ओबीसीच्या न्यायार्थ योगेश ठाकरे, यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वात ही निवेदने सादर करण्यात येईल. या निवेदनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या स्वाक्षरी त्यांना त्यांचे आरक्षण ओबीसींची जनगणना महाराष्ट्रातील संपूर्ण अंगणवाडी स्तरावरून ग्रामपंचायत मार्फत शासन व प्रशासनाने जनगणना करून सीमित अवधीत हे कार्य पूर्ण करावे अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
ओबीसी जनजागृती यात्रा ही संविधान चौक नागपूर येथून नाना पटोले प्रा. बबन तायवाडे डॉ. जीवतोडे प्राचार्य कमी खासदार डॉ. अनिल बोंडे चंद्रशेखर भडांगे, प्रफुल्ल काळपांडे, तुषार बापू इत्यादी मान्यवर याप्रसंगी आमंत्रित केलेले असून ही यात्रा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला, पुणे, अमरावती, या विविध मार्गाने मुंबईला आझाद मैदान येथे पोहोचून येथील ओबीसी बांधवांच्या सोबत चर्चात्मक बैठक घेऊन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, या मार्गांनी संशोधन भवन दिल्ली येथे पोहोचून जंतर-मंतर संसद भवन नवी दिल्लीत समापन होईल. येथील ओबीसी बांधव व आमदार, खासदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
तेव्हा ओबीसी बांधवांनी या 9552624294 क्रमांकावर आर्थिक मदत करून या यात्रेला यशस्विता प्रदान करण्यास आपला बहुमूल्य संयोग देण्याचे आवाहन योगेश ठाकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केली आहे.