बंडखोरांचे हे तर माकडचाळे; ओवैसी
मुंबई: महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, राज्यातील राजकीय घडामोडींवर आमचेही लक्ष आहे. ते बंडखोर माकडांसारखे वागत आहे. माकडचाळे करताहेत, माकडांचा डांस सुरू आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहे. लोकांचे घर जळत असल्याचे दिसत आहे. आमच्याकडून हे पाहणे होत नाही. मात्र, पाहवं लागत आहे. कारण, हा महाविकास आघाडीचा घरचा प्रश्न आहे. आम्ही यात काहीही करून शकत नाही, असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
राज्यात सुरू असलेला प्रकार हा महाविकास आघाडी यांचा अतर्गत प्रश्न आहे. यात आम्ही काही करून शकत नाही. आम्ही लहान आहोत. आमचा पक्ष लहान आहे. मात्र, माझी भूमिका मोठी ठरणार आहे. राज्यात सुरू असलेल्या प्रकारावर मला काहीही बोलायचे नाही, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
*पुढे काय करावे हे महाविकास आघाडीने ठरवावे*
शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सुरू असलेल्या प्रकरणानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे. हा त्यांचा प्रश्न आहे. याला मी काही करू शकत नाही. काय करावे आणि काय करू नये हे महाविकास आघाडीने ठरवावे. याचे आम्हाला काहीही करायचे नाही, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच बिघडले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. पाहुण घेण्याची धमकी दिली जात आहे. अद्याप हे प्रकरण शांत झालेले नाही. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच बिघडले आहे. आम्ही हे शांतपणे पाहत आहोत. कारण हा आमचा विषय नाही, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.