नैसर्गिक आपत्ती बाबत राज्य शासनाला विनोद खोब्रागडे यांची सूचना
गजानन ढाकुलकर
नागपूर : विनोद के.खोब्रागडे एक अभ्यासू जबाबदार व जागरुक नागरिका कडून महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे की, नैसर्गिक पुरामुळे तसेच आलेल्या आपत्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी या नैसर्गिक पुरामुळे प्रभावित झाली आहे,अनेकांचे घरे उद्वस्त झाले आहे,त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक खाजगी कंपन्याचा लाखो करोड रुपयांचा महाघोटाळा त्यांनी पुराव्यासह उघडकीस आणून ८२ भ्रष्टाचारी अधिकारी यांची नावासह यादीच मुंबई मंत्रालयात सादर केली आहे. शासनाने फक्त त्यांची अवैध मलमत्ता जप्तीची आदेश द्यावे,आणि तोच पैस महाराष्ट्रातील,अनेक नैसर्गिक आपत्ती मध्ये प्रभावित जिल्ह्याला,विषेशतः चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना,व गावकऱ्यांना मदत होईल.
केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता,फक्त दोन लाईनचा ८२ भ्रष्टाचारी अधिकारी, व अवैध कंपनीवर जप्तीचा आदेश राज्य सरकारने काढावा व हजारो करोड रूपये आठ दिवसात शासनाकडे जमा करून घ्यावा अशा आशयाची सूचना विनोद खोब्रागडे रा. वरोरा जि. चंद्रपूर यांनी राज्य सरकारला केली आहे.