असंघटित कामगारांना ई.पी.पी.योजना लागू करा
नागपूर: असंघटित कामगारांच्या ठिय्यावर उन्ह, पाऊस, वाऱ्या पासून सुरक्षेच्या दृष्टीने निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, माथाडी कामगारांच्या साठी जसे कल्याण मंडळ स्थापन करण्यात आलेत तसेच असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या तरतुदी लागू करण्यात यावे, असंघटित कामगारांना ई.पी.पी.योजना लागू करण्यात यावे यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने अप्पर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात सहायक आयुक्त लोया यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिष्टमंडळात आंबेडकरी विचार मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, जेष्ठ नेते अँड सुरेश घाटे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, विदर्भ प्रदेश सचिव प्रवीण आवळे, शहराध्यक्ष प्रा. रमेश दुपारे, रमेश ऊईके, राजु दादा पांजरे, हंसराज उरकुडे, आनंद गोरे, हे उपस्थित होते. लोया साहेबांनी निवेदनात नमूद मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.