राज्यस्तरीय कवीसंमेलन आढावा बैठक
लातूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर च्या वतीने दरवर्षी नवोदित कवी लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व मराठी भाषा सक्षमीकरण हा उद्देश बाळगून कवीसंमेलनाचे आयोजन केले जाते.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “साहित्यगंध दिपोत्सव २०२२” या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन , “राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार २०२२” व कवीसंमेलन सोहळा लातूर येथील बुद्ध गार्डन येथे आयोजित करण्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष मा.राहुल पाटील, नागपूर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य आयोजक कवी संग्राम कुमठेकर,मा.दिनेश निलंगेकर (संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले प्रा.विद्यालय) , कवी प्रा.कल्याण राऊत, मा.दीपरत्न निलंगेकर (दूरदर्शन प्रतिनिधी) , प्रा.शंकर वाघमारे , मा.महेश बिराजदार,मा.राम कदम, शिवाजी नामपल्ले, यांची आढावा बैठक दि.११ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.
दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे “राज्यस्तरीय कवीसंमेलन” भव्य दिव्य करण्यासाठी बैठकीमध्ये अचूक नियोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील व मुख्य आयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कवी/कवयित्री यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.