
53 वा सीटू स्थापना दिवस उत्साहात साजरा
नागपूर: सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ( सी आय टी यू ) चा 53 वा स्थापना दिवस एक एक उत्पादन भवन येथे शेकडो कर्मचाऱ्यांचे उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. 1970 मध्ये स्थापन झालेल्या देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे महत्त्व ज्यांना विविध क्षेत्रात काम करणारे कर्मचारी इथून नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटित होत आहेत. आज देशाला कामगार चळवळीची गरज असून देशातील संविधान आज वाचवण्याची सर्वात मोठी गरज आहे.
मोदी सरकार आल्यापासून कामगारांची स्थिती दयनीय झालेली आहे सरकारी उद्योग विकल्या जात आहेत बेरोजगारांची संख्या वाढत चाललेली आहे कामगार, शेतकरी, शेतमजुरांचे प्रथम मिशन मोदी सरकार हटाव – देश बचाओ संविधान बचाव हे असून याकरता सर्वांनी जोमाने तयारीला लागण्याची गरज आहे. हिंदु राष्ट्राच्या नावाने मनुस्मृति लागण्याच्या मोदी सरकारचा प्रयत्न आहे महिलांना परत सती प्रथेच्या दलदलीमध्ये झोपण्याच्या प्रयत्न मोदी सरकार करत आहे कामगारांमध्ये जातीपातीच्या नावाने आपसामध्ये लढवण्याचे प्रयत्न मोदी सरकार करत असून त्यावर कामगारांनी सजग राहणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कॉ.अरुण लाटकर, कॉ . मोहम्मद ताजुद्दीन, कॉ . विश्वनाथ असाई यांनी मार्गदर्शन केले, कॉ . राजेंद्र साठे यांनी संचालन केले व कॉ. विठ्ठल घेऊन घरी यांनी आभार प्रदर्शन केले.