“संकटात धावून येतो माणसातील देव”; सुहास हिरेमठ

“संकटात धावून येतो माणसातील देव”; सुहास हिरेमठ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उदय निरगुडकर संपादित “आम्ही देव पाहिला” पुस्तक प्रकाशन सोहळा_

_अमृता खाकुर्डीकर पुणे, प्रतिनिधी_

पुणे.: दैवी आणि आसुरी प्रवृत्तींमधील संघर्ष माणसाच्या मनात कायम सुरू असतो. जेव्हा मनुष्यातील सद्वृत्ती जागी होते, तेव्हा सामान्य माणूसही असामान्य काम करून जातो आणि संकटात माणसातील देव धावून येतो” असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी व्यक्त केले.  जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ स्पार्क फाउंडेशनच्या केअर प्रकल्पा अंतर्गत हिंदुस्थान प्रकाशन निर्मित ‘देव पाहिलाय आम्हीं ‘ पुस्तक प्रकाशन समारंभात सुहास हिरेमठ बोलत होते.

यावेळी त्यांच्या हस्ते कोविड असिस्टंटस् रिसर्च डॉक्युमेंटेशन, ” केअर ” या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. करोना काळात समाजाच्या मदतीला धावून आलेल्या देवदूतांच्या कथा ‘देव पाहिलाय आम्हीं ‘ या पुस्तकात विविध लेखकांनी चित्रीत केल्या आहेत. गणेश सभागृहात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर जनकल्याण समितीचे कोषाध्यक्ष चंदन कटारिया, विवेक स्पार्क फाऊंडेशनच्या संचालक मुग्धा वाड, कार्यवाह महेश पोहनेरकर, उपस्थित होते.

“आम्ही देव पाहिला” या पुस्तकाचे संपादक, वरीष्ठ पत्रकार व माध्यमकर्मी डॉ.उदय निरगुडकर यांनी संपादकीय भूमिका मांडताना कोरोना संकट आणि तत्कालीन सामाजिक स्थितीचा साक्षेपाने आढावा घेतला. ते म्हणाले, भविष्यातील संकटांचा विचार करून कोरोनासारख्या  महासाथीचे अशाप्रकारे दस्त ऐवजीकरण होणे आवश्यक होते. याव्दारे संकटकाळात केलेल्या उपाययोजना भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. “आम्ही देव पाहिलाय” या पुस्तकातील कथा नायकांचा संघर्षमय प्रवास माणसातल्या देवत्वाची खात्री देणारा आहे. अशा प्रेरणादायी व सच्च्या कहाण्या लोकांसमोर येणे आवश्यक आहे. अन्यथा सोशल मिडियावरचे स्वयंघोषित तज्ज्ञ विपरीत माहितीद्वारे लोकांना भ्रमित करीत असतात.

जॉन हॉकीन्ससारख्या संस्थेच्या अहवालाचा हवाला देऊन ४० कोटीं भारतीय मृत्यूमुखी पडतील, असेही भाकीत करणारे लोक होते. असा माणुसकीवरचा विश्वास उडत असताना मानवतेची उंची वाढविणारे कोरोना योद्ध्यांचे काम म्हणजे जीवनाचे पसायदान आहे”अशा शब्दात निरगुडकरांनी करोना योध्दयांचा गौरव केला. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, प्रणव सखदेव यांनी दृक् श्राव्य माध्यमाव्दारे उपस्थितांशी संवाद साधला.
पुस्तक निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक स्पार्क फाऊंडेशनचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी केले. सूत्रसंचालन चित्रा नातू-वझे यांनी केले.  विवेक स्पार्क फाऊंडेशनच्या संचालक मुग्धा वाड यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी उदय निरगुडकर यांनी कोरोना योध्दये कथानायक आणि त्यांचे चित्रण करणारे लेखक यांच्याशी खास अनौपचारिक संवाद साधला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles