माजी आमदाराची अपघातग्रस्त दुचाकीस्वारांना मदत
_’देव तारी त्याला कोण मारी’ हेच अंतिम सत्य_
अकोला: रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्त रुग्णांना तातडीचे उपचार मिळाल्यास जीव वाचण्याचे प्रमाण पटीने वाढते. खरे तर, ‘ देव तारी त्याला कोण मारी’ हेच अंतिम सत्य आहे. अशांना तातडीने मदत केल्यास मृत्यू दर खूप कमी होतो, ते आज मी करू शकलो, याचे मला समाधान वाटते. असे मत अकोल्याचे माजी आमदार रणजीत पाटील यांनी व्यक्त केले.
रणजीत पाटील दि ०७ जून रोजी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा आटोपून, दारव्हा मार्गे अकोला येथे जात होते. प्रवासादरम्यान रस्त्यावरती, कारंजा पासून १३ की. मी. अंतरावर रात्रीच्या सुमारास अंदाजे बारा ते एकच्या दरम्यान दुचाकीचा भीषण अपघात झालेला त्यांना दिसला. अपघातग्रस्त दुचाकीस्वारांसाठी येणारे-जाणारे कुठलेही वाहन मदतीला थांबत नव्हते. दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावरती रक्तबंबाळ होऊन पडलेले होते.अशा अवस्थेत त्यांना टाकून पुढे जाणे माजी आमदारांच्या मनाला पटले नाही.
आमदार पाटील यांनी तातडीने त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल केले. दोघांची प्राथमिक तपासणी केली असता दोघांनाही हेड इंजुरी आणि कॉलर बोन फॅक्चर झाले असल्याचे प्रथम दर्शनी निदान केले. तशाच परिस्थितीत त्यांना गाडीत घेऊन कारंजाचे उप जिल्हा रुग्णालय गाठले. ड्युटीवरील डॉक्टरला घेऊन रुग्णांना तातडीचे उपचार करण्यास मदत केली. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना व पोलिसांना कळविले, पुढच्या उपचाराबद्दल सूचना दिल्या व माजी आमदार परतीच्या प्रवासाला लागले.
सदर दोन्ही रुग्ण हे ग्राम लोही, तालुका दारव्हा,जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सदर प्रतिनिधीस सांगीतले