‘कोरोनामुळे माझी स्मरणशक्ती गेली’; ईडी चौकशीत ‘या’ मंत्र्याचे आश्चर्यकारक उत्तर
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मंत्री संत्येंद्र जैन यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. दरम्यान या चौकशी दरम्यान त्यांनी कोरोनामुळे आपली स्मरणशक्ती गेली असल्याचा दावा केला आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी काही दस्तावेज दाखवून त्यांची विचारपूस केली होती. यावेळी त्यांना अधिकाऱ्यांकडून काही प्रश्न विचारण्यात आले.
याला त्यांनी हे अजबच उत्तर दिले. जैन यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीने न्यायालयात ही आश्चर्यकारक माहिती दिली. मनी लाँड्रीगप्रकरणी ईडीने मंत्री सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली. नंतर त्यांना ९ जूनपयर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कोठडी संपत असल्याने त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने त्यांची कोठडी वाढविण्याची मागणी केली होती.
जैन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कोठडी वाढवून देण्याची गरज नसल्याचा दावा केला. आता, याप्रकरणी सत्येंद्र यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्त हरिहरन यांनी बाजू मांडली. तर, सरकारच्या वतीने एडिशनल सॉलिटर जनरल एसबी राजू यांनी जैन यांच्या जामिन याचिकेवर बाजू मांडली. त्यानंतर, न्या. गीतांजली गोयल यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे.