शिंदे गटाचे खाते वापटही ठरले..!!
मुंबई: एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण कवच दिल्याने भाजप सक्रिय झाला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटात सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप आणि शिंदे गटामध्ये सरकार स्थापनेसाठी मंथन सुरू असून मंत्रीपदांच्या वाटपाची ब्लू प्रिंट जवळपास अंतिम झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने 29 मंत्रीपदे स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला असून एकनाथ शिंदे गटाला 13 मंत्रीपदे दिली जाऊ शकतात. यापैकी 8 जणांना कॅबिनेट मंत्री तर 8 जणांना राज्यमंत्री बनवण्याची तयारी आहे.
भाजपसोबत सरकार स्थापन झाल्यास एकनाथ शिंदे, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्री केले जाऊ शकते. उपमुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे गटाकडून दबाव निर्माण केला जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, अद्याप यावर एकमत झालेले नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे गट लवकरच राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. खरे तर, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते की, विधानसभा उपसभापतींकडून अपात्रतेची नोटीस आलेल्या १५ बंडखोरांना १२ जुलैपर्यंत उत्तर देता येईल