पुढच्या ४८ तासात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी?
मुंबई: आज सांयकाळी दिल्लीहून परत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची बैठक घेऊन लागलीच फडणवीस आपल्या भाजपाच्या नेत्यासह रात्री १०.०० वा राजभवनात दाखल झाले असून, मविआ सरकार अल्पमतात असल्यामुळे बहुमत सिद्ध करण्याबाबत पत्र देण्यासाठी राज्यपाल यांच्या भेटीसाठी राजभवनात पोहचल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त होत आहे.
दिल्लीवारी नंतर लगेच एक्शन मोडमध्ये आलेल्या भाजपाने मविआ ला बहुमत सिद्ध करण्यासाठीचे पत्र देण्यासाठी दिल्लीहून ‘ग्रीन सिग्नल’ भेटल्याचे समजते. दरम्यान बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेळ देणार याबाबतही चर्चा होणार असून, येत्या पुढच्या ४८ तासात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात असेही सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून पुढे येत आहेत.
काल कोर्टात संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा उल्लेख झाल्याने आज संजय राऊत काही नरम पाहायला मिळत आहे.आज संजय राऊत याना ईडी कार्यालयात ११ वाजता हजार राहण्याची नोटीस मिळाली होती. महाराष्ट्राचं राजकारण आज एका वेगळ्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बंडखोर आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध आहे तसेच बंडखोर आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री याना भाजप सोबत पुन्हा युती करण्याचा आग्रह करत आहेत. तसेच बंडखोर आमदारांचा म्हणणं आहे कि आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत यामुळे उद्धवसाहेबानी आम्हाला गद्दार म्हणू नये, आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत.