‘आणवी’तील गावगुंडांना अटक करा; ऑल इंडिया पँथर सेना
प्रमोद गाडगे
आणवी: बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील आणवी गावातील गाव गुंडाना तात्काळ अटक करण्यात यावी, खुलेआम दलितांवर अन्याय, अत्याचार सुरु आहेत. आणवी या गावात गेल्या तीसते चाळीस वर्षापासून गायरान जमीनीवर तिथे राहणाऱ्या दलितांच्या ताब्यात असून ,पोटाची भुक भागविण्याकरिता हा समाज तिथे,सजमीन कसून उदरनिर्वाह करत आसतो.
या गायरान जमिनीवर मालकी हक्क करण्यासाठी सातत्याने दलित समाजावर हल्ले केले जात आहे. सळो की पळो अवस्था करत काठया,कुऱ्हाडीने काल महिलेसहित गावगुंडाने आमनुषपणे त्यांचावर हल्ला करीत,जबर मारहण करण्यात आली.यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.तात्काळ आणवी या गावातील गावगुंडाच्या मुसक्या आवळुन ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच आणवी या गावातील ग्रामपंचायत तात्काळ बरखास्त करण्यात यावी.जातीयवादी सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. व या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे.नवे सरकार येताच मनावतेला काळिमा फासेल एवढी भयान घटना महाराष्ट्रात घडत आहे यांचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करते.
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार, खासदार, पालकमंत्री, पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या पिडितांनासंरक्षण देण्याचे करावे. आणि त्यांना न्याय देण्याची भुमिका घ्यावी. अन्यथा महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. यांची नोंद प्रशासनानी घ्यावी.अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना लातूर जिल्हा अध्यक्ष कुणाल इंगळे यांनी केली.